2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 21 November 2019

सुधीर पटवर्धन : मानवी संबंधांचा शोध घेणारा चित्रकार


सुधीर पटवर्धनांच्या एकूण कलाप्रवासाचा आढावा घेतला तर त्यांच्या चित्रांतील विषयांना भोवतालच्या वास्तवाचे व वर्तमानकाळाचे स्पष्ट संदर्भ असल्याचं लक्षात येतं. आजूबाजूच्या सामाजिक घनांना, विशिष्ट क्षणांना साकार करताना केवळ स्वत:चं अंतर्गत कल्पनाविश्‍व, अमूर्त संकल्पना प्रतीकात्मकरीत्या किंवा रूपकाद्वारे सादर करण्याचे फारसे प्रयत्न दिसत नाहीत. पण 1998 साली बरीचशी चित्रं करताना मात्र त्यांनी प्रतीकांचा आधार घेत अभिव्यक्ती केली आहे.

‘मॉरल काऊन्सल’, ‘स्लिप’, ‘फॉल’, ‘डिव्हाइड’, ‘एण्ड ऑफ द सेंच्युरी’ या एकाच कालावधीत केलेल्या चित्रांत प्रतीकांचा समर्थपणे वापर केला आहे. प्रतीकात्मकतेच्या रूढ संकल्पनेप्रमाणे परिचित जगाची, वस्तुविषयांची अनोळखी, अतार्किक वाणारी मांडणी आणि सरळ, प्रत्यक्ष अर्थापेक्षा चित्रातील घकांच्या परस्परसंबंधांद्वारे मांडलेली कल्पना, विचार (कन्सेप्) या पातळीवर, ‘मॉरल काउन्सल’, ‘स्लिप’, किंवा अगदी अलीकडचं ‘विनेस’, ही चित्रं गेली आहेत. ‘फॉल’, ‘एण्ड ऑफ द सेंच्युरी’ या चित्रांतील प्रतीकात्मकता व विषयाची मांडणी मात्र प्रथमदर्शनी तार्किक वाणारी, पण काहीसा अतार्किकतेचा स्पर्श असणारी आहेत. उदाहरणार्थ, ‘एण्ड ऑफ द सेंच्युरी’मधील पुरुषाची पारदर्शक व्यक्तिरेखा. या प्रकारची मांडणी त्यांच्या अनेक चित्रांत प्रथमपासूनच दिसते.

‘अ‍ॅक्सिडें ऑन मे डे’मध्ये सरळ दिसणार्‍या वास्तव दृश्यामागे जसा गर्भित अर्थ होता, तसा गर्भित अर्थ ‘फॉल’ या चित्रातही आहे. विस्कळीत झालेल्या संघना किंवा असंघति कामगारांच्या अस्तित्वाचा विचार त्यांनी आपल्या बर्‍याच कलाकृतींमधून व्यक्त केला आहे. अशीच अस्थिर व डळमळीत आधार असलेली मजुराची प्रतिमा ‘फॉल’मध्ये दिसते. चित्राच्या उजव्या चिंचोळ्या भागात दूरचं आणि जवळचं अशी दोन दृश्यं दिसतात. जवळच्या दृश्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलेला नाला तर दुसर्‍या दृश्यात ेकडी, पाणी इत्यादींचा व्यापक आसमंत दिसतो. दोन्ही दृश्यांच्या मधे ओरडणारी मैना दिसते. पण चित्राची मोठी डावी बाजू ही परातीवरून घसरून पडलेला मजूर, तपशीलवार रंगवलेली खिडकी, ाइल्स या घकांनी व्यापली आहे. आधार गमावल्यामुळे मजुराचं पतन झालं आहे, असा अर्थ त्यांच्या अनेक वास्तव व तार्किक मांडणी केलेल्या चित्रांतून दिसून येतो.

‘स्लिप’ या चित्रातील मांडणीही अशीच अतार्किक वाणारी असून अनेक प्रकारच्या विरोधी तत्त्वांनी चित्र साकारलं आहे. प्रकाशझोतात कष्ट करणारा कार्यमग्न वृद्ध, तर पार्श्‍वभूमीला सोलापुरी चादर गुंडाळून स्वस्थ झोपलेली व्यक्ती; तसंच छाया-प्रकाश, निद्रिस्त-जागृत, कष्टकरी-सुखासीन यांचा विरोधाभास चित्रभर दिसतो. एखाद्या ओवीच्या दोन्ही बाजूंना असतात तशा नियंत्रण रेषा, पॅर्नचा वापर करून ‘स्लिप’च्या दोन्ही बाजूंना दिल्या आहेत.

कलाकृतींमध्ये आठवणी रंगवताना सहसा धूसर, अस्पष्ट, विस्कळीत स्वप्नांची मांडणी करावी तसं चित्रण केलं जातं. पण ‘मेमरी : डबल पेज’ या आठवणींशी निगडित चित्रात विशिष्ट स्थळांना व प्रत्यक्षातल्या परिचित वास्तूंना, पर्स्पेक्विचे प्रयोग करत सादर केलं होतं. ‘मॉरल काउन्सल’ हे चित्रदेखील त्यांच्या आठवणींशी संबंधित असून विषय सादर करताना अतार्किक मांडणी व प्रतीकांचा वापर केला आहे. सायकलवरून मुक्तपणे, स्वैर भकणारा पौगंडावस्थेतला मुलगा, त्याच्या भवितव्याबद्दल वाणार्‍या काळजीतून नैतिकतेचं मार्गदर्शन करणारी पालकाची प्रतिमा चित्राच्या खालच्या अर्ध्या भागात दिसत आहे. पाल्य व पालकाच्या वेशभूषा, सायकलसारखी वस्तू या आधुनिक काळातील घकांच्या तुलनेत वरील भागातील प्रतिमा इतिहासकालीन आहेत.

पाश्‍चिमात्य धारणेनुसार नरकाची कल्पना, वाममार्गाने गेल्यास भोगावे लागणारे परिणाम व होणारी छळवणूक यांचा इशारा आपल्या पाल्याला देणारा पालक चित्रात दाखवला आहे. पंधराव्या शतकातील फ्लेमिश चित्रकार रॉजर व्हॅन देर वायडन याने चित्रित केलेल्या नरकयातनांतील ाीप्रतिमेचा उपयोग पवर्धनांनी नैतिकतेचा धडा व इशारा देण्यासाठी केला आहे.

आपल्या कलाप्रवासात त्यांना कलावंताचं आपल्या विषयाशी असलेलं नातं सतत तपासण्याची गरज वाली आहे. विषयात अमर्याद गुंतणं किंवा त्यापासून दुरावा साधणं; स्वत:च्या मानसिक, भावनिक आंदोलनांनाच प्राधान्याने अभिव्यक्त करणं की दुसर्‍याचं जीवन समजून घेणं; स्वत:ला एका अविचल अवस्थेकडे, पूर्णत्वाकडे नेणं की सतत बदलणार्‍या बाह्य जगाबरोबर बदलत राहणं, अशा संघर्षातून वा काढण्याचा ते सतत प्रयत्न करताना दिसतात. प्रत्यक्षात कलाकृतीची मांडणी करतानासुद्धा द्वंद्वाचे अनेक आविष्कार रचनाबंधात दिसून येतात. त्यांच्या प्रतिमांमध्ये सबल-दुर्बल, शांत-अशांत, अंतर्गत-बहिर्गत, उजळ-गडद किंवा तीव्र छाया-प्रकाशभेद असा विरोध जाणवतो. अवकाशविभाजन करताना उभे-आडवे भौमितिक विभाजन, शुद्ध रंगांची एकमेकांशेजारी योजना, भक्कम-भरीव रचनेच्या विरोधात रिक्त-पोकळ रचना असा रचनाबंध त्यांच्या बहुेतक कलाकृतींमध्ये दिसतो तेव्हा एकीकडे चित्रातील एकसंधतेला बाधा आणणारे घक म्हणून ते येत असले तरी त्यांच्या संदर्भमूल्यांमुळेच परस्परांचं अस्तित्वही ते अर्थपूर्ण करतात.

1980 साली, म्हणजे आपल्या कलाप्रवासाच्या सुरुवातीच्या काळात, हिमाचल प्रदेशातील कसौली येथे भरलेल्या कलावंतांच्या एका कॅम्पमध्ये पवर्धनांनी त्यांची आधुनिकोत्तर कलेची कल्पना मांडली होती. त्यात त्यांनी व्यक्तीव्यक्तीच्या संबंधांवर भर दिला होता. जुन्या, रूढ सामाजिक संबंधांमध्ये माणसांच्या काही समान जाणिवा, अनुभव असायचे व ते त्यांच्या आयुष्याला अर्थ देत समृद्ध करायचे, त्याचबरोबर स्थैर्य व सुरक्षाही द्यायचे. विसाव्या शतकात सुरुवातीपासून सर्वच क्षेत्रांत सामाजिक बदलाची गती उत्तरोत्तर प्रचंड वाढल्यावर रूढ सामाजिक संबंध कालबाह्य व टाकाऊ झाले. पवर्धनांच्या पिढीने तर आणीबाणीपूर्व व नंतरची राजकीय-सामाजिक स्थिती, ऐंशीनंतरचं मुक्त आर्थिक धोरण व जागतिकीकरणाची प्रक्रिया, सोव्हिएत रशियाचं पतन व नंतरचं एकखांबी तंबू झालेलं जग, देशांतर्गत झालेले सत्ताबदल, सांप्रदाायिक दंगली, पुरोगामी विचारसरणीला बसलेले धक्के, चळवळी व आंदोलनांची झालेली पीछेहा याबरोबरच इलेक्र्ॉनिक व माध्यमक्षेत्रात झालेली क्रांती, त्यातून जवळ आलेलं जगˆअशा अनेक घना अनुभवल्या. यातील बहुतांशी घना ऐंशीनंतर घडलेल्या असल्या तरी औद्योगिक क्रांतीनंतर सामाजिक बदलांनी पकडलेल्या गतीचे परिणाम म्हणून मानवी संबंधात जो विस्कलेपणा आला होता, त्याला केंद्र करून व्यक्ती-व्यक्तींमधील नात्याची (इंर-सब्जेक्ििव्ही) त्यांची कल्पना पवर्धनांनी 1980 साली मांडली होती.

सामाजिक बदलांचा परिणाम म्हणून माणसाला भग्नतेचा, आतून तुलेपणाचा, खंडितपणाचा अनुभव येत होता. समाजव्यवस्थेतील वाढत्या व्यामिश्रतेमुळे एकाच व्यक्तिमत्त्वात अनेक व्यक्तिमत्त्वं धारण करण्याची गरज भासू लागली. एकाच चेहर्‍याचे विविध चेहर्‍यांत रूपांतर होऊन अनेक तुकड्यातुकड्यांच्या ओळखी (मल्पिल आयडेिंजि) निर्माण झाल्या. अशा खंडित (फ्रॅग्मेण्ेड) व्यक्तीचा त्याच्यासारख्याच इतर व्यक्तींबरोबर सुसंवाद निर्माण होणं, सहजसुंदर नातं अस्तित्वात येणं कठीण होऊन बसलं आहे. पूर्वी माणसांना उपलब्ध असणार्‍या समान जाणिवांचं क्षेत्र संकुचित झालं आहे किंवा तिचा इतरांच्या जाणिवांशी, विचारांशी संघर्ष तीव्र झाला आहे. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीशी तिचे स्वतंत्र विचार, श्रद्धा, स्वायत्तता अबाधित राखून तिच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. या मार्गाने आपल्या नव्या व मानुष जाणिवा विस्तारत इतरांच्या जाणिवांशी संवादी राखण्याचा सतत प्रयत्न केला तरच भक्कम आधारावर नव्या सामूहिक जाणिवा, समूहभावना निर्माण होणं शक्य आहे. समाजातल्या अशा परस्परसंबंधांचं (इंर-सब्जेक्ििव्ही) क्षेत्र थोडं थोडं करत वाढवण्याचा प्रयत्न कलेमध्ये सतत होत राहिला पाहिजे, असं पवर्धनांना वातं.

समाजात श्रद्धाविहीनतेचा, रितेपणाचा अनुभव येत असण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध विचारवंत दि. के. बेडेकर यांनी 1972 साली एका नवीन प्रकारच्या धर्मपर्यायी मानवश्रद्धेची गरज प्रतिपादन केली होती. साठ व सत्तरच्या दशकातील प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील वातावरणाची सविस्तर चर्चा लेखाच्या सुरुवातीला केली आहे. या तत्कालीन विद्रोही परिस्थितीबरोबरच एकूणच विश्‍व व मानवजातीच्या संबंधात श्रद्धेबद्दल, मूल्यांबद्दल, पारंपरिक धर्मश्रद्धांबद्दल तेव्हा प्रश्‍न निर्माण होऊ लागले होते. औद्योगिक क्रांतीनंतर वेगाने बदलत गेलेल्या समाजव्यवस्थेत व्यक्तिगत पातळीवर माणसांमध्ये एकाकीपणाची व निराधार होत असल्याची भावना दृढ होत होती. अशा वेळी एखाद्या संवेदनशील कलावंताच्या आयुष्यात श्रद्धेचं स्थान काय असू शकतं? किंवा स्वीकारलेल्या श्रद्धेचं स्वरूप कसं असेल? भोवताली समाजात पारंपरिक धर्मश्रद्धेबद्दल भ्रमनिरास झालेला असताना त्याच्या आयुष्यात निर्माण होणारी पोकळी कशी भरून येते? पवर्धनांचा कलाप्रवास अभ्यासताना साहजिकच हे प्रश्‍न प्रकर्षाने जाणवतात. 1973 साली मुंबईत स्थलांतर करताना त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्राची निवड केली होती व माणसांचीच चित्रं काढण्याचा निर्णय घेतला होता. तिथून सुरू झालेल्या आपल्या तीस-पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अतू श्रद्धेने त्यांनी कलेची साधना केली व अतिशय जिव्हाळ्याने मानवी संबंधांचा शोध घेत लोकायतदर्शन घडवलं. मानुष जगाचा वास्तव आविष्कार आपल्या कलेतून केला. अपूर्णाशी संघर्ष करत पूर्णत्वाच्या दिशेने वाचाल करताना ‘संदेहवृत्ती’ व ‘द्वंद्वात्मक’ पद्धतींचा आधार घेत स्वत:च्या व इतरांच्या जाणिवा त्यांनी आपल्या कलेद्वारा विस्तारल्या व समृद्ध केल्या आहेत.

विसाव्या शतकात प्रभावी असणारे विचारप्रवाह, विचारप्रणाल्या, मानवी इतिहासाशी संबंधित तत्त्वज्ञानं, संस्कृतीच्या विकासाचे प्रचलित सिद्धान्त याबद्दलही साशंकता आताच्या प्राप्त परिस्थितीत निर्माण होऊ लागली आहे. सत्तरच्या दशकात असणारे सामाजिक तत्त्वज्ञानांचे पर्यायी आधारही आता गमावले गेल्याची भावना निर्माण झाली असून काहीशी संभ्रमावस्था जाणवते आहे. पण तरीही मानवी सामर्थ्य, त्याची संघर्षशील वृत्ती, स्वत:च्या मर्यादा ओलांडत व आत्मविकास करत अवकाश विस्तारत जाण्याची त्याची क्षमता, यावर पवर्धनांचा पूर्ण विश्‍वास असल्यामुळे मानुषतेचा सकारात्मक व आशादायक आविष्कार येणार्‍या काळातील त्यांच्या कलेत दिसून येईल याबद्दल शंका वात नाही.

- पद्माकर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...