2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 21 November 2019

सुधीर पटवर्धन : मानवी संबंधांचा शोध घेणारा चित्रकार


सुधीर पटवर्धनांच्या एकूण कलाप्रवासाचा आढावा घेतला तर त्यांच्या चित्रांतील विषयांना भोवतालच्या वास्तवाचे व वर्तमानकाळाचे स्पष्ट संदर्भ असल्याचं लक्षात येतं. आजूबाजूच्या सामाजिक घनांना, विशिष्ट क्षणांना साकार करताना केवळ स्वत:चं अंतर्गत कल्पनाविश्‍व, अमूर्त संकल्पना प्रतीकात्मकरीत्या किंवा रूपकाद्वारे सादर करण्याचे फारसे प्रयत्न दिसत नाहीत. पण 1998 साली बरीचशी चित्रं करताना मात्र त्यांनी प्रतीकांचा आधार घेत अभिव्यक्ती केली आहे.

‘मॉरल काऊन्सल’, ‘स्लिप’, ‘फॉल’, ‘डिव्हाइड’, ‘एण्ड ऑफ द सेंच्युरी’ या एकाच कालावधीत केलेल्या चित्रांत प्रतीकांचा समर्थपणे वापर केला आहे. प्रतीकात्मकतेच्या रूढ संकल्पनेप्रमाणे परिचित जगाची, वस्तुविषयांची अनोळखी, अतार्किक वाणारी मांडणी आणि सरळ, प्रत्यक्ष अर्थापेक्षा चित्रातील घकांच्या परस्परसंबंधांद्वारे मांडलेली कल्पना, विचार (कन्सेप्) या पातळीवर, ‘मॉरल काउन्सल’, ‘स्लिप’, किंवा अगदी अलीकडचं ‘विनेस’, ही चित्रं गेली आहेत. ‘फॉल’, ‘एण्ड ऑफ द सेंच्युरी’ या चित्रांतील प्रतीकात्मकता व विषयाची मांडणी मात्र प्रथमदर्शनी तार्किक वाणारी, पण काहीसा अतार्किकतेचा स्पर्श असणारी आहेत. उदाहरणार्थ, ‘एण्ड ऑफ द सेंच्युरी’मधील पुरुषाची पारदर्शक व्यक्तिरेखा. या प्रकारची मांडणी त्यांच्या अनेक चित्रांत प्रथमपासूनच दिसते.

‘अ‍ॅक्सिडें ऑन मे डे’मध्ये सरळ दिसणार्‍या वास्तव दृश्यामागे जसा गर्भित अर्थ होता, तसा गर्भित अर्थ ‘फॉल’ या चित्रातही आहे. विस्कळीत झालेल्या संघना किंवा असंघति कामगारांच्या अस्तित्वाचा विचार त्यांनी आपल्या बर्‍याच कलाकृतींमधून व्यक्त केला आहे. अशीच अस्थिर व डळमळीत आधार असलेली मजुराची प्रतिमा ‘फॉल’मध्ये दिसते. चित्राच्या उजव्या चिंचोळ्या भागात दूरचं आणि जवळचं अशी दोन दृश्यं दिसतात. जवळच्या दृश्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलेला नाला तर दुसर्‍या दृश्यात ेकडी, पाणी इत्यादींचा व्यापक आसमंत दिसतो. दोन्ही दृश्यांच्या मधे ओरडणारी मैना दिसते. पण चित्राची मोठी डावी बाजू ही परातीवरून घसरून पडलेला मजूर, तपशीलवार रंगवलेली खिडकी, ाइल्स या घकांनी व्यापली आहे. आधार गमावल्यामुळे मजुराचं पतन झालं आहे, असा अर्थ त्यांच्या अनेक वास्तव व तार्किक मांडणी केलेल्या चित्रांतून दिसून येतो.

‘स्लिप’ या चित्रातील मांडणीही अशीच अतार्किक वाणारी असून अनेक प्रकारच्या विरोधी तत्त्वांनी चित्र साकारलं आहे. प्रकाशझोतात कष्ट करणारा कार्यमग्न वृद्ध, तर पार्श्‍वभूमीला सोलापुरी चादर गुंडाळून स्वस्थ झोपलेली व्यक्ती; तसंच छाया-प्रकाश, निद्रिस्त-जागृत, कष्टकरी-सुखासीन यांचा विरोधाभास चित्रभर दिसतो. एखाद्या ओवीच्या दोन्ही बाजूंना असतात तशा नियंत्रण रेषा, पॅर्नचा वापर करून ‘स्लिप’च्या दोन्ही बाजूंना दिल्या आहेत.

कलाकृतींमध्ये आठवणी रंगवताना सहसा धूसर, अस्पष्ट, विस्कळीत स्वप्नांची मांडणी करावी तसं चित्रण केलं जातं. पण ‘मेमरी : डबल पेज’ या आठवणींशी निगडित चित्रात विशिष्ट स्थळांना व प्रत्यक्षातल्या परिचित वास्तूंना, पर्स्पेक्विचे प्रयोग करत सादर केलं होतं. ‘मॉरल काउन्सल’ हे चित्रदेखील त्यांच्या आठवणींशी संबंधित असून विषय सादर करताना अतार्किक मांडणी व प्रतीकांचा वापर केला आहे. सायकलवरून मुक्तपणे, स्वैर भकणारा पौगंडावस्थेतला मुलगा, त्याच्या भवितव्याबद्दल वाणार्‍या काळजीतून नैतिकतेचं मार्गदर्शन करणारी पालकाची प्रतिमा चित्राच्या खालच्या अर्ध्या भागात दिसत आहे. पाल्य व पालकाच्या वेशभूषा, सायकलसारखी वस्तू या आधुनिक काळातील घकांच्या तुलनेत वरील भागातील प्रतिमा इतिहासकालीन आहेत.

पाश्‍चिमात्य धारणेनुसार नरकाची कल्पना, वाममार्गाने गेल्यास भोगावे लागणारे परिणाम व होणारी छळवणूक यांचा इशारा आपल्या पाल्याला देणारा पालक चित्रात दाखवला आहे. पंधराव्या शतकातील फ्लेमिश चित्रकार रॉजर व्हॅन देर वायडन याने चित्रित केलेल्या नरकयातनांतील ाीप्रतिमेचा उपयोग पवर्धनांनी नैतिकतेचा धडा व इशारा देण्यासाठी केला आहे.

आपल्या कलाप्रवासात त्यांना कलावंताचं आपल्या विषयाशी असलेलं नातं सतत तपासण्याची गरज वाली आहे. विषयात अमर्याद गुंतणं किंवा त्यापासून दुरावा साधणं; स्वत:च्या मानसिक, भावनिक आंदोलनांनाच प्राधान्याने अभिव्यक्त करणं की दुसर्‍याचं जीवन समजून घेणं; स्वत:ला एका अविचल अवस्थेकडे, पूर्णत्वाकडे नेणं की सतत बदलणार्‍या बाह्य जगाबरोबर बदलत राहणं, अशा संघर्षातून वा काढण्याचा ते सतत प्रयत्न करताना दिसतात. प्रत्यक्षात कलाकृतीची मांडणी करतानासुद्धा द्वंद्वाचे अनेक आविष्कार रचनाबंधात दिसून येतात. त्यांच्या प्रतिमांमध्ये सबल-दुर्बल, शांत-अशांत, अंतर्गत-बहिर्गत, उजळ-गडद किंवा तीव्र छाया-प्रकाशभेद असा विरोध जाणवतो. अवकाशविभाजन करताना उभे-आडवे भौमितिक विभाजन, शुद्ध रंगांची एकमेकांशेजारी योजना, भक्कम-भरीव रचनेच्या विरोधात रिक्त-पोकळ रचना असा रचनाबंध त्यांच्या बहुेतक कलाकृतींमध्ये दिसतो तेव्हा एकीकडे चित्रातील एकसंधतेला बाधा आणणारे घक म्हणून ते येत असले तरी त्यांच्या संदर्भमूल्यांमुळेच परस्परांचं अस्तित्वही ते अर्थपूर्ण करतात.

1980 साली, म्हणजे आपल्या कलाप्रवासाच्या सुरुवातीच्या काळात, हिमाचल प्रदेशातील कसौली येथे भरलेल्या कलावंतांच्या एका कॅम्पमध्ये पवर्धनांनी त्यांची आधुनिकोत्तर कलेची कल्पना मांडली होती. त्यात त्यांनी व्यक्तीव्यक्तीच्या संबंधांवर भर दिला होता. जुन्या, रूढ सामाजिक संबंधांमध्ये माणसांच्या काही समान जाणिवा, अनुभव असायचे व ते त्यांच्या आयुष्याला अर्थ देत समृद्ध करायचे, त्याचबरोबर स्थैर्य व सुरक्षाही द्यायचे. विसाव्या शतकात सुरुवातीपासून सर्वच क्षेत्रांत सामाजिक बदलाची गती उत्तरोत्तर प्रचंड वाढल्यावर रूढ सामाजिक संबंध कालबाह्य व टाकाऊ झाले. पवर्धनांच्या पिढीने तर आणीबाणीपूर्व व नंतरची राजकीय-सामाजिक स्थिती, ऐंशीनंतरचं मुक्त आर्थिक धोरण व जागतिकीकरणाची प्रक्रिया, सोव्हिएत रशियाचं पतन व नंतरचं एकखांबी तंबू झालेलं जग, देशांतर्गत झालेले सत्ताबदल, सांप्रदाायिक दंगली, पुरोगामी विचारसरणीला बसलेले धक्के, चळवळी व आंदोलनांची झालेली पीछेहा याबरोबरच इलेक्र्ॉनिक व माध्यमक्षेत्रात झालेली क्रांती, त्यातून जवळ आलेलं जगˆअशा अनेक घना अनुभवल्या. यातील बहुतांशी घना ऐंशीनंतर घडलेल्या असल्या तरी औद्योगिक क्रांतीनंतर सामाजिक बदलांनी पकडलेल्या गतीचे परिणाम म्हणून मानवी संबंधात जो विस्कलेपणा आला होता, त्याला केंद्र करून व्यक्ती-व्यक्तींमधील नात्याची (इंर-सब्जेक्ििव्ही) त्यांची कल्पना पवर्धनांनी 1980 साली मांडली होती.

सामाजिक बदलांचा परिणाम म्हणून माणसाला भग्नतेचा, आतून तुलेपणाचा, खंडितपणाचा अनुभव येत होता. समाजव्यवस्थेतील वाढत्या व्यामिश्रतेमुळे एकाच व्यक्तिमत्त्वात अनेक व्यक्तिमत्त्वं धारण करण्याची गरज भासू लागली. एकाच चेहर्‍याचे विविध चेहर्‍यांत रूपांतर होऊन अनेक तुकड्यातुकड्यांच्या ओळखी (मल्पिल आयडेिंजि) निर्माण झाल्या. अशा खंडित (फ्रॅग्मेण्ेड) व्यक्तीचा त्याच्यासारख्याच इतर व्यक्तींबरोबर सुसंवाद निर्माण होणं, सहजसुंदर नातं अस्तित्वात येणं कठीण होऊन बसलं आहे. पूर्वी माणसांना उपलब्ध असणार्‍या समान जाणिवांचं क्षेत्र संकुचित झालं आहे किंवा तिचा इतरांच्या जाणिवांशी, विचारांशी संघर्ष तीव्र झाला आहे. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीशी तिचे स्वतंत्र विचार, श्रद्धा, स्वायत्तता अबाधित राखून तिच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. या मार्गाने आपल्या नव्या व मानुष जाणिवा विस्तारत इतरांच्या जाणिवांशी संवादी राखण्याचा सतत प्रयत्न केला तरच भक्कम आधारावर नव्या सामूहिक जाणिवा, समूहभावना निर्माण होणं शक्य आहे. समाजातल्या अशा परस्परसंबंधांचं (इंर-सब्जेक्ििव्ही) क्षेत्र थोडं थोडं करत वाढवण्याचा प्रयत्न कलेमध्ये सतत होत राहिला पाहिजे, असं पवर्धनांना वातं.

समाजात श्रद्धाविहीनतेचा, रितेपणाचा अनुभव येत असण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध विचारवंत दि. के. बेडेकर यांनी 1972 साली एका नवीन प्रकारच्या धर्मपर्यायी मानवश्रद्धेची गरज प्रतिपादन केली होती. साठ व सत्तरच्या दशकातील प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील वातावरणाची सविस्तर चर्चा लेखाच्या सुरुवातीला केली आहे. या तत्कालीन विद्रोही परिस्थितीबरोबरच एकूणच विश्‍व व मानवजातीच्या संबंधात श्रद्धेबद्दल, मूल्यांबद्दल, पारंपरिक धर्मश्रद्धांबद्दल तेव्हा प्रश्‍न निर्माण होऊ लागले होते. औद्योगिक क्रांतीनंतर वेगाने बदलत गेलेल्या समाजव्यवस्थेत व्यक्तिगत पातळीवर माणसांमध्ये एकाकीपणाची व निराधार होत असल्याची भावना दृढ होत होती. अशा वेळी एखाद्या संवेदनशील कलावंताच्या आयुष्यात श्रद्धेचं स्थान काय असू शकतं? किंवा स्वीकारलेल्या श्रद्धेचं स्वरूप कसं असेल? भोवताली समाजात पारंपरिक धर्मश्रद्धेबद्दल भ्रमनिरास झालेला असताना त्याच्या आयुष्यात निर्माण होणारी पोकळी कशी भरून येते? पवर्धनांचा कलाप्रवास अभ्यासताना साहजिकच हे प्रश्‍न प्रकर्षाने जाणवतात. 1973 साली मुंबईत स्थलांतर करताना त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्राची निवड केली होती व माणसांचीच चित्रं काढण्याचा निर्णय घेतला होता. तिथून सुरू झालेल्या आपल्या तीस-पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अतू श्रद्धेने त्यांनी कलेची साधना केली व अतिशय जिव्हाळ्याने मानवी संबंधांचा शोध घेत लोकायतदर्शन घडवलं. मानुष जगाचा वास्तव आविष्कार आपल्या कलेतून केला. अपूर्णाशी संघर्ष करत पूर्णत्वाच्या दिशेने वाचाल करताना ‘संदेहवृत्ती’ व ‘द्वंद्वात्मक’ पद्धतींचा आधार घेत स्वत:च्या व इतरांच्या जाणिवा त्यांनी आपल्या कलेद्वारा विस्तारल्या व समृद्ध केल्या आहेत.

विसाव्या शतकात प्रभावी असणारे विचारप्रवाह, विचारप्रणाल्या, मानवी इतिहासाशी संबंधित तत्त्वज्ञानं, संस्कृतीच्या विकासाचे प्रचलित सिद्धान्त याबद्दलही साशंकता आताच्या प्राप्त परिस्थितीत निर्माण होऊ लागली आहे. सत्तरच्या दशकात असणारे सामाजिक तत्त्वज्ञानांचे पर्यायी आधारही आता गमावले गेल्याची भावना निर्माण झाली असून काहीशी संभ्रमावस्था जाणवते आहे. पण तरीही मानवी सामर्थ्य, त्याची संघर्षशील वृत्ती, स्वत:च्या मर्यादा ओलांडत व आत्मविकास करत अवकाश विस्तारत जाण्याची त्याची क्षमता, यावर पवर्धनांचा पूर्ण विश्‍वास असल्यामुळे मानुषतेचा सकारात्मक व आशादायक आविष्कार येणार्‍या काळातील त्यांच्या कलेत दिसून येईल याबद्दल शंका वात नाही.

- पद्माकर कुलकर्णी

Thursday 7 November 2019

प्रगतिशील लेखक संघाचे संमेलन


अस्मितांचे प्रांतीय आणि जातीय संदर्भ यात सामान्य माणसाची दिशाभूल केली जात आहे असे उद्गार प्रगतिशील लेखक संघाच्या जयपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटक पद्मश्री भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी काढले.

प्रगतिशील लेखक संघाचे तीन दिवसीय 17वे संमेलन 13, 14, 15 सप्टेंबर 2019ला जयपूर (राजस्थान)च्या रवींद्र मंच या ठिकाणी झाले. या संमेलनात देशभरातून 26 राज्यांतून प्रलेसंचे 470 सभासद आले होते. यांच्या व्यतिरिक्त संमेलनात इप्टा, जलेस, दलेस, जसमचे प्रतिनिधी आणि जयपूरचे साहित्यप्रेमी, पत्रकार, संस्कृतीकर्मी भारतातील प्रमुख साहित्यकार उपस्थित होते.
तीन दिवस चालणारे हे राष्ट्रीय संमेलन ऐतिहासिकच होते. सलग चालणारे वेगवेगळे वैचारिक सत्र, काव्यसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, डिबेट, पॅनलचर्चा पुस्तक प्रकाशन, सांस्कृतिक नाट्य प्रस्तुती, चित्रपट कार्यक्रमांना मोठी गर्दी होती. या वेळी पहिल्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला. नेहरूंना अभिवादन करणे हे खरे औचित्यपूर्ण काम या वेळी झाले. निघालेल्या रॅलीतही देशभरातून आलेल्या, नामांकित तीनशे साहित्यिकांचा सहभाग होता. उद्घाटक गणेश देवी, मेघा पानसरे, आनंद मेणसे आदी महाराष्ट्रातून गेलेले प्रतिनिधीही होते. पुस्तक विक्रीलाही लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. खर्या अर्थाने अखिल भारतीय लेखक संमेलन झालं ज्यामध्ये सर्व भाषीय नवे तरुण आणि वरिष्ठ लेखक उपस्थित होते.

या संमेलनात उपरोक्त विषयांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांना स्पर्श केला गेला. प्रलेसंचा वारसा आणि प्रलेसंचे सुरुवातीचे सर्व साहित्यिकांच्या योगदान आणि कलाकृतींची स्मृती या वेळी जागवण्यात आली. रवींद्र मंचच्या दालनात सर्व प्रगतिशील साहित्यिकांचे छायाचित्रे होती. ज्यात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या प्रतिमेजवळ देशभरातील लेखक कवी सेल्फी काढून घेत होते. या वेळीचौडा रास्ताही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली ज्यात विभिन्न राज्यांतील प्रलेसंचा गेल्या तीन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. ही स्मरणिका प्रत्येकास देण्यात आली. इप्टा आजमगडची प्रस्तुती असणारी लोकधारा आणि लोकनृत्याने प्रभात फेरीसह, त्यांच्या स्वतंत्रपणे झालेल्या कार्यक्रमांत राज्यस्थानी लोकजीवनाची झाकी प्रस्तुत केली. आनंद पटवर्धन यांच्याविवेक रिझही फिल्म दाखवण्यात आली. या फिल्मद्वारे महाराष्ट्राचे हळूहळू गेल्या पाच वर्षांत कसेकम्युनलबनत गेल्याचे चित्र देशापुढे ठेवले.

उद्घाटन सत्रात डॉ. गणेश देवी यांनीसद्यकालीन भाषाव्यवहार धोक्यात आल्याचे सार्यांच्या ध्यानात आणून दिले. नवनवे माध्यमं तयार होत असताना, लिप्या मृतप्राय ठरत असताना साहित्यकारांनी आपल्या लिखित अशा प्रिंट माध्यमांवर अवलंबून राहणे सर्वथा अयोग्य ठरेल. सद्यकालीन भांडवली व्यवस्था ही मनुष्यत्वापुढेच एक मोठे आव्हान म्हणून उभी असताना सर्वसामान्य माणसाला मार्ग दाखवण्याचे कार्य साहित्यकारांनी करायचे असते. पण तुमची बोलीच नष्ट केली जाते आहे. तेव्हा या संकटाचा सामना कसा करणार हा खरा प्रश् आहे. देशातील सर्व प्रागतिक लोकांनी आपल्या बोली आणि लोकभाषा जपत या राष्ट्रीय मंचावर एक होत संघटितपणे विरोध करण्यासाठी आणि विविध धोरणांची चिकित्सा करण्याची गरज आहे. एक सर्वमान्य कार्यक्रम देशातल्या बुद्धिमंतापुढे या मंचावरून ठेवता येईल का हाही विचार या अधिवेशनात करायला हवा. जगभरात उजवा विचार बोकाळत असला तरी ते ते समाज आणि तेथील विवेकी लंक त्या विरोधात एकजूट होत आहेत. आम्ही दक्षिणायनच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला. राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या नावावर देशाला अत्यंत धोकादायक वळणावर सरकार घेऊन जात आहे. सीमित आणि संकुचित होत जाणारे अस्मितांचे प्रांतीय आणि जातीय संदर्भ यात सामान्य माणसाची दिशाभूल केली जाते आहे. यातून साहित्यकार समाजाला बाहेर काढू शकतात.’

नवी दिल्लीचे प्रभात पटनाईक यांनी राष्ट्रवादाचा उगम, विस्तार, वाटचाल आणि व्याप्ती याबाबत आपली मतं मांडली. त्यांनी आपल्या वक्तव्यातून काही गंभीर निरीक्षणे मांडली. युरोपात सुरू झालेले हे राष्ट्रवादाचे भूत अविकसित देशात विकृत आणि हिंस्र रूप धारण केलेले आहे. अतिरेकी राष्ट्रवाद हा आपला शत्रू स्वत: विकसित करीत असतो. त्या राष्ट्र हे लोकांसाठी नसते तर लोकांपेक्षाही उच्च स्थानावर राष्ट्र ठेवले जाते. भारतीय राष्ट्रवाद हा इंपेरिलिझमला जोडला गेला आहे. येथील राष्ट्रवाद हा बहुसंख्याकांच्या शोषणव्यवस्थेच्या हितसंबंधाचे प्रात्यक्षिक करणारा आहे. ’र्िेेंग्ेल्स् ग्े ूप र्ोूास र्िंदस् दर्िं र्ूग्दहत्ग्ेल्स्होय असे प्रतिपादन केले.
या अधिवेशनात जलेस (अनुपजी, दलित लेखक संघ दिल्ली (अध्यक्ष, हिरालाल राजस्थानी) आणि इप्टा (राकेशजी, महासचिव) या संस्थांनीही एका सत्रात सहभागी होत प्रलेसंच्या सोबत किमान समान कार्यक्रमात सहभागी असू हे आश्वासन दिले. भूतकालीन चुका दुरुस्त करण्याची ही वेळ असल्याचे सार्यांचे एकमत होते.

दुसर्या दिवशी वंचिताच्या साहित्य आणि ओळख हा परिसंवाद झाला ज्यात मेघा पानसरे यांनी महिला प्रतिनिधी म्हणून आपले मत मांडले. गोविंद पानसरे यांचे कुटुंबीय या अर्थाने त्यांचे अनुभव देशभरातील लोकांना ऐकण्याची उत्सुकता दिसून आली. तसेच याच परिसंवादात संजय दोबाडे यांनी आदिवासी साहित्य आणि मराठी समाज यावर मार्मिक टिपण्णी केल्या. दुसरा परिसंवाद विषय होता विकासाचा अर्थ ज्याचा समन्वयवसुधाचे संपादक विनीत तिवारी यांनी समन्वयकाचे काम केले. परिसंवादात या वेळी आदिवासी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष एस. पी. शुक्ला यांनी विकासाची परिभाषा करण्याचा प्रयत्न केला. शुक्ला म्हणाले कास्ट आणे क्लास यांचा विचार करून सामाजिक न्यायाची भूमिका मध्यवर्ती असेल तर तो विकास हिताचा असतो. पण भारतात आज तसे काहीही घडत नाही. अभिव्यक्तीच्या याच परिसंवादात उमा या राज्यस्थानातील पत्रकार होत्या त्या म्हणाल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात विद्रोही महिलेस हमखासरसोईसारखे सदर चालवायला दिले जातात, हेसुद्धा अभिव्यक्तीच्या गळचेपीचा प्रकार होय. दुसरी महिला रुपा ज्या दिल्लीहून आल्या होत्या त्यांनी अर्बन नक्षलच्या मुद्द्यावर आपले भाष्य केले. त्या म्हणाल्या वर्वरा राव यांना पेपर आणि पेनही तुरुंगात दिला जात नाही. सरकार एवढं का घाबरतं?

काश्मीरच्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे परिसंवाद झाला ज्यात तेथील लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी खलिद हुसैन यांनी सांगितले की 370 हे कलम भारत सरकारने लावलेले नव्हते. तर हिंदूंच्या मागणीवरून राजा हरीसिंग याने एकोणीसशे सत्तावीस साली लागू केलेले होते. हिंदू जमीनदारांना वाटत असे की, इतरांना मुक्त वावर दिल्यास आपल्या जमिनी कुणीही बळकावू शकेल या धास्तीतून त्यांनी राजाद्वारे अशी तजवीस केलेली होती.

विनय आदर यांनी भारतभर बुद्धिजीवींची केली गेलेली धरपकड यावर आपले भाष्य केले. आनंद तेलतुंबडे यांच्या . पी. डब्ल्यूतलारिपब्लिक ऑफ कास्टया लेखातले काही बारकावे सांगितले. तसेच कांच्या इलय्या यांचेपोस्ट हिंदू इंडिया’, हंसराज शोवेंद्र शेखर यांचा आदिवासींवरील पुस्तकांचा उल्लेख केला. असे अनेक उदाहरणे देत त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विमर्श घेतला. त्यात त्यांनी सांगितले की, गैर हिंदीभाषी बुद्धिजीवी जोखीम घ्यायला तयार आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्या हिंदी बेल्टमध्ये विरोध दिसत नाही. दलितांच्या मुद्द्यावर आजही समाजात आत्मावलोकनाची गरज आहे असे ते म्हणाले.

हिंदीतले कवी आणि प्रसिद्ध कथालेखक उदयप्रकाश यांनी वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले. नव्या युगात माणसाचा मेंदू हा डस्टबीनसारखा झाला आहे. आपल्या सृजनशील लेखकाला पावलोपावली सेंसर लावल्यासारखे चालावे लागते. अस्वस्थता तर येणारच पण डर हीच तर शक्ती असते. आज सृजनाचा हा सुपीक काळ आहे. जेव्हा गाईपासून ऑक्सिजन मिळतो असे रेटून सांगितले जाते तेव्हा आपला सेंसर नीट चालला पाहिजे. भारतात सर्वाधिक तरुण आहेत असे म्हणतात पण याच तरुणांना गांजा दिल्यासारखे राष्ट्रवादाने हिप्नोटाइझ केले जाते. आपले शिक्षणाचं प्रायमरी युनिट असतो परिवार, पण शिक्षण देण्यात हे युनिट पूर्णत: अपयशी झाले आहे. परिवारातून दिले जाणारे शिक्षण टीव्ही माध्यमामुळे बंद झाले आहे. लेखकासाठी त्याचा ग्रंथासारखे असते त्याचे स्वत:चे जीवन परंतु ती समग्रता आता हरवत चालली आहे. अशा वेळी एकदिवस असाही येईल समाजात लेखक असणार नाही. लेखक वाचवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. लेखक हा असतो तरी कोण? लेखक हा प्रत्येक धोक्याची सूचना देणारा, उत्तरदायी असणारा घटक असतो.

दुसर्या दिवशी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुखदेव सिंह सिरसा यांची नवे राष्ट्रीय महासचिव या पदावर निवड करण्यात आली. त्यांच्यासह अन्य अठ्ठ्याहत्तर सदस्यांचे अध्यक्षीय मंडल यांच्या सोबतीला असेल. प्रलेसंचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मा. पुन्नीलन तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून अली जावेद यांची निवड करण्यात आली.
राकेश वानखेडे

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...