2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 7 November 2019

प्रगतिशील लेखक संघाचे संमेलन


अस्मितांचे प्रांतीय आणि जातीय संदर्भ यात सामान्य माणसाची दिशाभूल केली जात आहे असे उद्गार प्रगतिशील लेखक संघाच्या जयपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटक पद्मश्री भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी काढले.

प्रगतिशील लेखक संघाचे तीन दिवसीय 17वे संमेलन 13, 14, 15 सप्टेंबर 2019ला जयपूर (राजस्थान)च्या रवींद्र मंच या ठिकाणी झाले. या संमेलनात देशभरातून 26 राज्यांतून प्रलेसंचे 470 सभासद आले होते. यांच्या व्यतिरिक्त संमेलनात इप्टा, जलेस, दलेस, जसमचे प्रतिनिधी आणि जयपूरचे साहित्यप्रेमी, पत्रकार, संस्कृतीकर्मी भारतातील प्रमुख साहित्यकार उपस्थित होते.
तीन दिवस चालणारे हे राष्ट्रीय संमेलन ऐतिहासिकच होते. सलग चालणारे वेगवेगळे वैचारिक सत्र, काव्यसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, डिबेट, पॅनलचर्चा पुस्तक प्रकाशन, सांस्कृतिक नाट्य प्रस्तुती, चित्रपट कार्यक्रमांना मोठी गर्दी होती. या वेळी पहिल्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला. नेहरूंना अभिवादन करणे हे खरे औचित्यपूर्ण काम या वेळी झाले. निघालेल्या रॅलीतही देशभरातून आलेल्या, नामांकित तीनशे साहित्यिकांचा सहभाग होता. उद्घाटक गणेश देवी, मेघा पानसरे, आनंद मेणसे आदी महाराष्ट्रातून गेलेले प्रतिनिधीही होते. पुस्तक विक्रीलाही लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. खर्या अर्थाने अखिल भारतीय लेखक संमेलन झालं ज्यामध्ये सर्व भाषीय नवे तरुण आणि वरिष्ठ लेखक उपस्थित होते.

या संमेलनात उपरोक्त विषयांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांना स्पर्श केला गेला. प्रलेसंचा वारसा आणि प्रलेसंचे सुरुवातीचे सर्व साहित्यिकांच्या योगदान आणि कलाकृतींची स्मृती या वेळी जागवण्यात आली. रवींद्र मंचच्या दालनात सर्व प्रगतिशील साहित्यिकांचे छायाचित्रे होती. ज्यात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या प्रतिमेजवळ देशभरातील लेखक कवी सेल्फी काढून घेत होते. या वेळीचौडा रास्ताही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली ज्यात विभिन्न राज्यांतील प्रलेसंचा गेल्या तीन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. ही स्मरणिका प्रत्येकास देण्यात आली. इप्टा आजमगडची प्रस्तुती असणारी लोकधारा आणि लोकनृत्याने प्रभात फेरीसह, त्यांच्या स्वतंत्रपणे झालेल्या कार्यक्रमांत राज्यस्थानी लोकजीवनाची झाकी प्रस्तुत केली. आनंद पटवर्धन यांच्याविवेक रिझही फिल्म दाखवण्यात आली. या फिल्मद्वारे महाराष्ट्राचे हळूहळू गेल्या पाच वर्षांत कसेकम्युनलबनत गेल्याचे चित्र देशापुढे ठेवले.

उद्घाटन सत्रात डॉ. गणेश देवी यांनीसद्यकालीन भाषाव्यवहार धोक्यात आल्याचे सार्यांच्या ध्यानात आणून दिले. नवनवे माध्यमं तयार होत असताना, लिप्या मृतप्राय ठरत असताना साहित्यकारांनी आपल्या लिखित अशा प्रिंट माध्यमांवर अवलंबून राहणे सर्वथा अयोग्य ठरेल. सद्यकालीन भांडवली व्यवस्था ही मनुष्यत्वापुढेच एक मोठे आव्हान म्हणून उभी असताना सर्वसामान्य माणसाला मार्ग दाखवण्याचे कार्य साहित्यकारांनी करायचे असते. पण तुमची बोलीच नष्ट केली जाते आहे. तेव्हा या संकटाचा सामना कसा करणार हा खरा प्रश् आहे. देशातील सर्व प्रागतिक लोकांनी आपल्या बोली आणि लोकभाषा जपत या राष्ट्रीय मंचावर एक होत संघटितपणे विरोध करण्यासाठी आणि विविध धोरणांची चिकित्सा करण्याची गरज आहे. एक सर्वमान्य कार्यक्रम देशातल्या बुद्धिमंतापुढे या मंचावरून ठेवता येईल का हाही विचार या अधिवेशनात करायला हवा. जगभरात उजवा विचार बोकाळत असला तरी ते ते समाज आणि तेथील विवेकी लंक त्या विरोधात एकजूट होत आहेत. आम्ही दक्षिणायनच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला. राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या नावावर देशाला अत्यंत धोकादायक वळणावर सरकार घेऊन जात आहे. सीमित आणि संकुचित होत जाणारे अस्मितांचे प्रांतीय आणि जातीय संदर्भ यात सामान्य माणसाची दिशाभूल केली जाते आहे. यातून साहित्यकार समाजाला बाहेर काढू शकतात.’

नवी दिल्लीचे प्रभात पटनाईक यांनी राष्ट्रवादाचा उगम, विस्तार, वाटचाल आणि व्याप्ती याबाबत आपली मतं मांडली. त्यांनी आपल्या वक्तव्यातून काही गंभीर निरीक्षणे मांडली. युरोपात सुरू झालेले हे राष्ट्रवादाचे भूत अविकसित देशात विकृत आणि हिंस्र रूप धारण केलेले आहे. अतिरेकी राष्ट्रवाद हा आपला शत्रू स्वत: विकसित करीत असतो. त्या राष्ट्र हे लोकांसाठी नसते तर लोकांपेक्षाही उच्च स्थानावर राष्ट्र ठेवले जाते. भारतीय राष्ट्रवाद हा इंपेरिलिझमला जोडला गेला आहे. येथील राष्ट्रवाद हा बहुसंख्याकांच्या शोषणव्यवस्थेच्या हितसंबंधाचे प्रात्यक्षिक करणारा आहे. ’र्िेेंग्ेल्स् ग्े ूप र्ोूास र्िंदस् दर्िं र्ूग्दहत्ग्ेल्स्होय असे प्रतिपादन केले.
या अधिवेशनात जलेस (अनुपजी, दलित लेखक संघ दिल्ली (अध्यक्ष, हिरालाल राजस्थानी) आणि इप्टा (राकेशजी, महासचिव) या संस्थांनीही एका सत्रात सहभागी होत प्रलेसंच्या सोबत किमान समान कार्यक्रमात सहभागी असू हे आश्वासन दिले. भूतकालीन चुका दुरुस्त करण्याची ही वेळ असल्याचे सार्यांचे एकमत होते.

दुसर्या दिवशी वंचिताच्या साहित्य आणि ओळख हा परिसंवाद झाला ज्यात मेघा पानसरे यांनी महिला प्रतिनिधी म्हणून आपले मत मांडले. गोविंद पानसरे यांचे कुटुंबीय या अर्थाने त्यांचे अनुभव देशभरातील लोकांना ऐकण्याची उत्सुकता दिसून आली. तसेच याच परिसंवादात संजय दोबाडे यांनी आदिवासी साहित्य आणि मराठी समाज यावर मार्मिक टिपण्णी केल्या. दुसरा परिसंवाद विषय होता विकासाचा अर्थ ज्याचा समन्वयवसुधाचे संपादक विनीत तिवारी यांनी समन्वयकाचे काम केले. परिसंवादात या वेळी आदिवासी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष एस. पी. शुक्ला यांनी विकासाची परिभाषा करण्याचा प्रयत्न केला. शुक्ला म्हणाले कास्ट आणे क्लास यांचा विचार करून सामाजिक न्यायाची भूमिका मध्यवर्ती असेल तर तो विकास हिताचा असतो. पण भारतात आज तसे काहीही घडत नाही. अभिव्यक्तीच्या याच परिसंवादात उमा या राज्यस्थानातील पत्रकार होत्या त्या म्हणाल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात विद्रोही महिलेस हमखासरसोईसारखे सदर चालवायला दिले जातात, हेसुद्धा अभिव्यक्तीच्या गळचेपीचा प्रकार होय. दुसरी महिला रुपा ज्या दिल्लीहून आल्या होत्या त्यांनी अर्बन नक्षलच्या मुद्द्यावर आपले भाष्य केले. त्या म्हणाल्या वर्वरा राव यांना पेपर आणि पेनही तुरुंगात दिला जात नाही. सरकार एवढं का घाबरतं?

काश्मीरच्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे परिसंवाद झाला ज्यात तेथील लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी खलिद हुसैन यांनी सांगितले की 370 हे कलम भारत सरकारने लावलेले नव्हते. तर हिंदूंच्या मागणीवरून राजा हरीसिंग याने एकोणीसशे सत्तावीस साली लागू केलेले होते. हिंदू जमीनदारांना वाटत असे की, इतरांना मुक्त वावर दिल्यास आपल्या जमिनी कुणीही बळकावू शकेल या धास्तीतून त्यांनी राजाद्वारे अशी तजवीस केलेली होती.

विनय आदर यांनी भारतभर बुद्धिजीवींची केली गेलेली धरपकड यावर आपले भाष्य केले. आनंद तेलतुंबडे यांच्या . पी. डब्ल्यूतलारिपब्लिक ऑफ कास्टया लेखातले काही बारकावे सांगितले. तसेच कांच्या इलय्या यांचेपोस्ट हिंदू इंडिया’, हंसराज शोवेंद्र शेखर यांचा आदिवासींवरील पुस्तकांचा उल्लेख केला. असे अनेक उदाहरणे देत त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विमर्श घेतला. त्यात त्यांनी सांगितले की, गैर हिंदीभाषी बुद्धिजीवी जोखीम घ्यायला तयार आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्या हिंदी बेल्टमध्ये विरोध दिसत नाही. दलितांच्या मुद्द्यावर आजही समाजात आत्मावलोकनाची गरज आहे असे ते म्हणाले.

हिंदीतले कवी आणि प्रसिद्ध कथालेखक उदयप्रकाश यांनी वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले. नव्या युगात माणसाचा मेंदू हा डस्टबीनसारखा झाला आहे. आपल्या सृजनशील लेखकाला पावलोपावली सेंसर लावल्यासारखे चालावे लागते. अस्वस्थता तर येणारच पण डर हीच तर शक्ती असते. आज सृजनाचा हा सुपीक काळ आहे. जेव्हा गाईपासून ऑक्सिजन मिळतो असे रेटून सांगितले जाते तेव्हा आपला सेंसर नीट चालला पाहिजे. भारतात सर्वाधिक तरुण आहेत असे म्हणतात पण याच तरुणांना गांजा दिल्यासारखे राष्ट्रवादाने हिप्नोटाइझ केले जाते. आपले शिक्षणाचं प्रायमरी युनिट असतो परिवार, पण शिक्षण देण्यात हे युनिट पूर्णत: अपयशी झाले आहे. परिवारातून दिले जाणारे शिक्षण टीव्ही माध्यमामुळे बंद झाले आहे. लेखकासाठी त्याचा ग्रंथासारखे असते त्याचे स्वत:चे जीवन परंतु ती समग्रता आता हरवत चालली आहे. अशा वेळी एकदिवस असाही येईल समाजात लेखक असणार नाही. लेखक वाचवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. लेखक हा असतो तरी कोण? लेखक हा प्रत्येक धोक्याची सूचना देणारा, उत्तरदायी असणारा घटक असतो.

दुसर्या दिवशी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुखदेव सिंह सिरसा यांची नवे राष्ट्रीय महासचिव या पदावर निवड करण्यात आली. त्यांच्यासह अन्य अठ्ठ्याहत्तर सदस्यांचे अध्यक्षीय मंडल यांच्या सोबतीला असेल. प्रलेसंचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मा. पुन्नीलन तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून अली जावेद यांची निवड करण्यात आली.
राकेश वानखेडे

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...