2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Sunday 16 June 2019

इंडियन अ‍ॅनिमल फार्म : माणसाच्या विचारविश्वाचा प्राण्यांनी केलेला स्वीकार


 प्रवीण बांदेकर यांचीइंडियन अॅनिमल फार्मही नवी कादंबरी. ‘चाळेगतउजव्या सोंडेच्या बाहुल्याया त्यांच्या आधीच्या दोन कादंबर्या गाजलेल्या आहेत. समकालीन वास्तवाला भाषिक पातळीवर जिवंत करण्यासाठी बांदेकर हे स्थानिक संस्कृतीचे  काही आदिम तर काही आधुनिक बंध बेमालूमपणे आपल्या कथनात मिसळतात. पण तो निव्वळ भाषिक प्रयोग नसतो, तर ती त्यांचीभाषिक कृतीअसते. ही कृती सभोवतालच्या वर्तमान वास्तवावर नोंदविलेली केवळ एक प्रतिक्रिया नसते. ती त्यांची सामाजिक उत्तरदायित्वाची मूल्यात्मक कृती असते. ही गोष्ट त्यांच्याइंडियन अॅनिमल फार्मया  नव्या कादंबरीने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

जॉर्ज ऑर्वेल यांचीॅनिमल फार्मही कादंबरी तिच्यातील ऐतिहासिक वास्तवाच्या अभिनव चित्रणासाठी प्रसिद्धच आहे. बांदेकर यांनीइंडियन अॅनिमल फार्महे नाव आपल्या नव्या कादंबरीला देताना अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. राजकीय पक्षाची पोथीनिष्ट विचारचौकट आणि मानवी संस्कृतीतील समानता-विषमता या आदिम मूल्यसंघर्ष यांची तत्कालीन वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर जॉर्ज ऑर्वेल यांनी केलेली मांडणी जागतिक साहित्यात एक जिवंत मिथक बनून राहिली आहे. ऑर्वेलचीच ‘1984’ ही त्यानंतरची आधुनिक साहित्यातील राजकीय भाष्य करणारी सर्वोत्तम कादंबरी मानली जाते.

बांदेकर यांनीइंडियन अॅनिमल फार्ममध्ये वर्तमान भारतीय परिप्रेक्ष्यात ऑर्वेलच्या दोन्ही कादंबर्यांचे शैलीसूत्र स्वीकारले आहे किंवा ऑर्वेलच्या कादंबर्यांवर समकालीन राजकीय घटनांचे केलेले कलम म्हणजेइंडियन अॅनिमल फार्महोय, असेही म्हणता येईल.  

कादंबरीचा प्रारंभ होतो तोइंडियन अॅनिमल फार्मम्हातार्या कृष्णा घोड्याच्या हत्येने. हिवाळ्यातल्या एका पहाटे कृष्णावर कोणीतरी गोळी झाडतो आणि पळून जातो. त्याच वेळी इंडियन अॅनिमल फार्मच्या नव्या मालकाचे आगमन होते. कृष्णा हा अॅनिमल फार्ममधील प्राण्यांना चार शहाणपणाच्या गोष्टी सांगणारा म्हातारा घोडा असतो. पशुपक्ष्यांनी आपसातील जाती विसरून एक व्हावं, शोषण करणार्या माणसाविरुद्ध संघटित व्हावं, आपल्या हक्कांसाठी लढावे असे सांगणारा कृष्णा घोडा आधार वाटायचा. ॅनिमल फार्ममधील सर्व कष्टकरी प्राण्यांची म्हातार्या कृष्णा घोड्याने एक संघटना बांधली होती, ‘श्रमिक प्राणी मोर्चा.’ पण वांशिक अस्मितेच्या आड सत्तेच्या राजकारणासाठी त्या शिवारात आणखी संघटना आहेत. जय समर्थ गँग हीइंडियन अॅनिमल फार्ममधील कुत्र्यांची संघटना. नानोपंत समर्थ हे जय समर्थ गँगचे सर्वेसर्वा. दुसरी एक संघटना आहे, जी हुजूर पार्टी. या पार्टीचे मुख्य आहेत, साहेबरावजी डुक्कर. इंडियन अॅनिमल फार्मच्या राजकारणातील या संघटना प्रमुख असल्या तरी सर्वोच्च नेता वेगळाच आहे. ‘नवा मालकया नावाने सगळे प्राणी त्याला ओळखतात. तो समोर कधी येत नाही. ‘बिग बॉसप्रमाणे तो फक्त स्क्रीनवर दर्शन देतो आणि जय समर्थ गँगचे कुत्रे आणि जी हुजूर पार्टीचे डुक्कर यांना हाताशी धरून इंडियन अॅनिमल फार्मच्या समस्त जनतेवर सत्ता गाजवतो. त्यासाठी प्राण्यांमध्ये शिवाराच्या विकासाचे स्वप्न तो पेरतो.


ॅनिमल फार्ममध्ये आलेल्या नव्या मालकाला विकास हवा असतो. त्यालाश्रमिक प्राणी मोर्चासारख्या संघटना आणि प्राण्यांचे प्रबोधन करणारे म्हातार्या कृष्णासारखे जुनेजाणते विचारवंत शत्रू वाटत असतात. नवा मालक फॉरेनमध्ये शिकला असला तरी त्याला आपल्या संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असतो. तो अॅनिमल फार्मच्या पहिल्याच भेटीत जी हुजूर पार्टीचे वराहपंडित आणि जय समर्थ गँगचे नानोपंत श्वान हे नव्या मालकाला गायींच्या गोठ्यात घेऊन जातात. तेथे नवा मालक गोमातेचं शेण-पवित्र गोबर उचलून भक्तिभावानं आपल्या मस्तकाला लावतो. प्रसाद म्हणून जिभेवरही ठेवतो. पहिल्याच भाषणात तो म्हणतो, मित्रांनो, गोवर्या थापत, नांगरट करत, भांग्लण करत, दूधदही विकत मी कसंबसं माझं शिक्षण केलं. गरिबी म्हणजे काय ते मी अनुभवलं आहे. तुमच्याशी बोलताना माझा कंठ दाटून आला आहे. पण मित्रांनो आता इंडियन अॅनिमल फार्ममधील जीवन असं कष्टाचं असणार नाही. इथून पुढे जे काही होईल ते चांगलंच असेल. याची मी गॅरंटी देतो. मी तुमचा स्वामी नाही. आयम युवर बिग ब्रदर. सीनिअर सर्वंट. मला दुसरं कोणतंही कुटुंब नाही. ना आई ना बाप. ना भाऊ ना बहीण. ना पत्नी ना मुलं. तुम्ही मला फक्त साथ द्या. इथे कोणी मालक नाही. नोकर नाही. आपण सगळे या शिवाराचे सेवेकरी. मीही तुमच्या सारखाच या शिवाराचा प्रधान सेवेकरी आहे.       

या भाषणाने समस्त प्राणी वर्ग भारावून जातो. इंडियन अॅनिमल फार्मला हिंदुस्थानातीलच नव्हे तर दुनियेतील नंबर एकचं शिवार बनवू या ही घोषणा त्यांना आवडते. नवा मालक त्यांना शिवाराच्या संस्कृतीची आठवण करून देतो. अभिमानास्पद इतिहास सांगतो. काही प्राणी खोटा इतिहास सांगून मालक म्हणतो, तुमच्यातीलच काही प्राणी  शोषण-पिळवणूक-विषमता-अन्याय-असहिष्णुता असे मोठमोठे पुस्तकी शब्द वापरून मालकाविरुद्ध भडकावणे, या शिवाराच्या पर्यायाने हिंदुस्थानच्या पवित्र भूमीविरुद्ध द्रोह करणं असे प्रकार करतात, त्यांच्यापासून सावध राहा असा सल्ला देतो.

इंडियन अॅनिमल फार्ममध्ये दुसर्या दिवशी जाहिराती झळकतात. फलक लागतात. त्यात नव्या मालकानं घालून दिलेली आचारसंहितेची कलमं असतात. भय्यालाल पोपट ही सगळी कलमं सर्वांना सांगतो. जय समर्थ गँगच्या कुत्र्यांची प्रत्येकाच्या हालचालीवर तीक्ष्ण नजर असते. झाडाझाडावर बसलेल्या कावळ्याच्या निगराणीखाली आपण आहोत. तशाही परिस्थितीत काही प्राण्यांच्या मनात म्हातार्या कृष्णा घोड्याच्या हत्येच्या तपासाबद्दल प्रश्न निर्माण होत असत. पण ते ओठावर येत नसत. 

पुढे पुढे नव्या मालकाच्या नावाने साहेबराव डुक्कर आपले वर्चस्व प्रस्थापित करतो. त्याला साथ देणार्या नानोपंत समर्थांना पुढे ते सहन होत नाही. वस्तुत: जय समर्थ गँगच्या कुत्र्यांच्या दहशतीनेच शिवारातील गायी, बैल, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आणि अन्य प्राण्यांचे शोषण सुरू असते. नव्या मालकाच्या नावाने खाद्यसामग्री गोळा केली जाते.  गायी-म्हशींचे शिंग आणि आचळाच्या आकारावरून कर वसुली केली जाते. हा अन्याय गरीब प्राणी सहन करतात. शिवाराबाहेरच्या  हिंस्र प्राण्यांकरवी अत्याचार बलात्कार करून त्याची जबाबदारी जय समर्थ गँगच्या कुत्र्यांवर टाकण्यात सर्व प्रसारमाध्यमांच्या आधारे  साहेबराव डुकराला यश येते. तिकडे नानोपंत समर्थ याच प्रकारे अत्याचार करून साहेबराव विरुद्ध कुजबुज मोहीम चालवून सत्तेला बदनाम करीत असतो.

थोडक्यात इंडियन अॅनिमल फार्ममध्ये समकालीन भारतीय राजकारणातील सर्वच कृती-विकृती आहेत. गोवंश, वराह आणि श्वान यांना आपणच या संस्कृतीमध्ये कसे पूजनीय आहोत असे वाटते. त्यांच्यात अस्मितेचे राजकारण सुरू होते. ‘इंडियन अॅनिमल फार्मचा मालक सोयी-सवलतीच्या मुद्द्यांवरून या जातीमध्ये युद्ध पेटवून देतो. महामोर्चे काढले जातात. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी मग अन्य प्राण्यांच्या हत्या-मारामार्या व बलात्कार हे प्रकार सुरू होतात. वेगवेगळे गट त्यातून मार्ग काढताना एकमेकांच्या हितसंबंधात कसे गुंतून जातात. हा कादंबरीचा मूळ कथाभाग आहे.

या कादंबरीचे मोठे यश म्हणजे अत्यंत रेखीव अशा व्यक्तिरेखा. मोजक्या प्रसंगातून नेमकेपणाने गेल्या अर्धशतकातील राजकारणाच्या पटावरील मोहर्यांचे सूक्ष्म स्वभावचित्रण करण्यात बांदेकर यशस्वी झाले आहेत. साहेबराव डुक्कर, नानोपंत यांच्याबरोबर चम्फी कुत्री, मोहिनी मांजर आणि बाजीराव गाढव अशी पात्रे यात येतात.  त्यामुळे अखेरपर्यंत कादंबरी चित्तथरारक प्रसंगांनी वाचकाला बांधून ठेवते.

कादंबरीचा शेवट लेखकाच्या वैचारिक दृष्टीच्या आणि कल्पनात्मक निर्मितीक्षमतेच्या उंचीचा प्रत्यय देणारा आहे. ज्या म्हातार्या कृष्णा घोड्याच्या मृत्यूने प्रारंभ होतो, त्याच कॉम्रेडच्या नव्या युगातील तरुण कार्यकर्त्यांचा पुन्हा जन्म होतो, असे मांडले आहे. ही मांडणीसुद्धा स्वप्न, अतिवास्तव आणि फ्यांटसीच्या वेगवेगळ्या परिमाणांनी अद्भुत झाली आहे.                  

माणसाच्या विचारविश्वाचा प्राण्यांनी केलेला स्वीकार, हे या कादंबरीचे गृहीत प्रतिपाद्य आहे. ते अत्यंत ताकदीने लेखकाने पेलले आहे. सत्य-अहिंसेपासून हिंसक दहशतवादापर्यंत. म्हणजे मानवी विचारविश्व आणि आचार-विचार यांचे शिवारातील प्राण्यांवर कलम केले आहे. यात प्राणी आणि मानव यांच्या  स्वभाववैशिष्ट्याचीही सरमिसळ झाली आहे. हे सगळे व्यक्त होते अर्थात भाषेत. पण ही भाषिक निर्मिती हीच या कादंबरीच्या कथनशैलीचे खरे सामर्थ्य आहे. मराठीतील प्राण्यांची नावे, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी, त्यांचे मनुष्यसदृश स्वभाव-हावभाव, ते आपले विचार, जगणे, दु:-आनंद, राग-संताप, हसणे-खिदळणे, प्रेम-प्रणय, मत्सर-द्वेष, हाजीहाजी-स्वाभिमान, लोभ-लंपटपणा, हत्या-बलात्कार हे सगळे उपलब्ध भाषेत कसे व्यक्त झाले आहे हे मुळातून पाहण्यासारखे आहे.  अशा अनेक वैचारिक, भावनिक, लैंगिक, राजकीय गमती भाषिक पातळीवर अनुभवण्यासाठी ही कादंबरी मुळातूनच वाचायला पाहिजे.
प्रमोद मुनघाटे

¦
(‘इंडियन अॅनिमल फार्मलेखक : प्रवीण दशरथ बांदेकर, शब्द पब्लिकेशन, मुंबई, मार्च 2019)

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...