2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 25 June 2020

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे


'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषदहा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ लोकवाङ्मय गृहतर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐतिहासिक परिषदेच्या शंभर वर्षे मागे जाऊन तिला अस्वस्थ शतकाशी जोडणारा हा ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण आणि समाजक्रांती घडवणार्‍या असंख्य संदर्भांशी जोडला गेला आहे. ग्रंथासाठी लेखकाने लिहिलेल्या दीर्घ मनोगताचा हा सारांश..

Sunday 21 June 2020

कोरोनानंतर काय होणार? - यान लियांके


सध्या आपण सर्वजण कोरोनामुळे धास्तावलेले आहोत. सर्व जगात कमी अधिक फरकानं हेच चित्र आहे. माणसाचं अस्तित्वच जणू पणाला लागल्याचं चित्र आहे. त्याचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, मानसिक, शारीरिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिणाम होणार हे उघड आहे. पण कोरोना ही काही अशा प्रकारची पहिलीच आपत्ती नाही. अशा अनेक मानवनिर्मित आपत्ती या आधीही आलेल्या आहेतच. मग आपण त्यातून धडे का घेत नाही? त्याच-त्याच चुका आपण वारंवार का करतो? आपल्याला आधीचं काही आठवत कसं नाही? स्मृतिभ्रंश झालेल्या अवस्थेत आपण का वावरतो? अशा अनेक प्रश्नांना सामोरं जाणाऱ्या यान लियांके Yan Lianke या चिनी लेखकाच्या एका भाषणाचं ओंकार गोवर्धन यांनी केलेले हे भाषांतर..

Tuesday 16 June 2020

कुणी घेऊ शकतंय, श्वास?

कुठल्या शब्दांत, निरर्थक शब्द वगळून, मी भारतीय म्हणून माझ्या बंधुभगिनींशी एकजूट व्यक्त करू? मिनिआपोलिस मधील तरूण आणि स्वातंत्र्यप्रिय लोक मला नाही का विचारणार की रोहित वेमुलाला आत्महत्या करावी लागली, तेव्हा सर्व भारतीय विद्यापीठांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी  निषेध व्यक्त केला का? नियमित दिसणाऱ्या झुंडबळींच्या दृश्यांनी भारतभरच्या लोकांच्या काळजाचा ठाव घेतला का? दलित मुली आणि मुलांवरील झालेले बलात्कार आणि खून यामुळे सर्व भारतीय संतप्त झाले का? कोणत्या शब्दांत मी त्यांना समजावू शकेन की लाखो आदिवासींना सर्व प्रकारच्या असमानतेचा सामना करावा लागत आहे आणि तरीही भारत सहजगत्या त्याकडे कानाडोळा करतो आहे.

Saturday 16 May 2020

भुकेल्यापोटी शहरात आले, उपाशीपोटी परत आपल्या गावी..


खरंतर विदेशात अडकलेल्या ३५ हजार भारतीयांना टाळेबंदीच्या पूर्वी कोणतेही पैसे न आकारता भारतात आणले गेले. पण या गोरगरीबरोजंदारीवर काम करणाऱ्या व गेले ३५ दिवस कोणताही रोजगार न मिळालेल्या कष्टकऱ्यांकडून ५०० रुपये तिकीट वसूल कारण्यात आले. या देशाचे नागरिक असलेल्या  लाखो असंघटित क्षेत्रातील कामगारांची दुःखे इथेच संपली नाहीततर कर्नाटक राज्याने बंगलोरमधून बिहारकडे जाणाऱ्या ५ रेल्वे ऐनवेळी रद्द केल्या. त्यामागील कहाणी कळाली तर हा निर्णय घेणारे किती निर्दयी असतीलहे दिसून येते. काही दिवसात लॉकडाऊन संपेल आणि इमारत बांधकामाला या मजुरांचा उपयोग होईलम्हणून या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय बिल्डर लॉबीला खूश करण्याकरिता घेतला गेला. स्वतंत्र देशाच्या नागरिक असलेल्या कामगारांना वेठबिगारीवर असलेल्या मजुरांसारखे वागविण्यात आले.

Saturday 9 May 2020

कोरोना आणि क्राऊड्स : आजच्या काळासाठी बोधकथा

(शेक्सपिअरच्या कॉरिओलेनस मधील एक प्रसंग दर्शवणारे चित्र)
भूकेल्या माणसांसमोर अन्य कोणताच पर्याय नसतो तेव्हा ती माणसं सत्ता नियंत्रण करणाऱ्यांना आव्हान देतात आणि त्यातून दंगली उसळतातसत्ताधाऱ्यांचा उद्दामपणानिरंकुश गर्व म्हणजेच ‘कोरोना’ आणि सामान्य भुकेल्या माणसांचा उपमर्द केला जातो तेव्हा इतिहासात अपरिहार्यपणे मानवी शोकांतिका घडल्याचे दिसतातजगातील अनेक संस्कृतीत प्राचीन काळापासून दुराभिमान आणि विनम्रताराजसत्ता आणि मानवी समूह यांच्यातील संघर्षावर आधारित अनेक दंतकथा आपल्यापर्यंत आलेल्या आहेतगणपतीविषयी अशीच एक दंतकथा स्कंद पुराणात आपल्याला पहायला मिळते.

भूकेची गाथा : भूकेचा दृश्य इतिहास


भुकेने मानवी इतिहासात आतापर्यंत किती बळी घेतले असतील? साहजिकच या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देणं कदाचित शक्य नसेलही. मात्र सर्वात जास्तहे ही एक उत्तर असू शकेल. मानवी इतिहासात सतत-अविरतपणे माणसे कशाने मरत आली आहेत याचे मात्र एकमेव उत्तर भूक हेच आहे. भुकेने माणूस मरणं हे कुणीच थांबवू शकलेलं नाही. आज कोरोनाने माणसं मरत आहेत. त्यावर उपचार किंवा लस सापडली की कोरोनाने माणसं मरायचे थांबतील. पण कोरोनाच्या टाळेबंदीतही माणसे भुकेने मरत आहेत. कोरोनानंतरही माणसं भुकेने मरत राहतील. भुकेच्या अशा अगणित छटा सर्व कलांमध्ये अविरतपणे अभिव्यक्त झालेल्या आहेत. कदाचित भुकेचे सर्वात जास्त प्रतिबिंब साहित्यात उमटलेलं असेल. कोणत्याही काळात भुकेबद्दलचं साहित्य कुठल्यातरी स्वरुपात लिहिलं गेलं असेल, असा मला ठाम विश्वास आहे. अगदी तुकारामाच्या गाथेलाही तत्कालीन दुष्काळाच्या कळा सोसाव्या लागल्याच असतील.

महात्मा फुलेंची एकमय भारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रबुद्ध भारत संकल्पना



कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे भीतीचे, असुरक्षिततेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या भीषण परिस्थितीचा सामना करताना आपण सगळे कमालीची एकजूटता दाखवत आहोत. कारण आपल्याला कल्पना आहे की एकजूटता दाखवल्याशिवाय आपण या संकटातून बाहेर पडूच शकत नाही. पण ही जी कोरोना विषाणूच्या भीतीपोटी आपण सध्या एकजूटता दाखवत आहोत तिला आपण महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेली एकमयता मानू शकतो का?

अलगीकरण : एक भ्रम


नोबेल पारितोषिक स्वीकारताना पाब्लो नेरुदा यांनी केलेले भाष्य..

साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेता महान चिली कवी पाब्लो नेरुदा (१२ जुलै १९०४ ते २३ सप्टेंबर १९७३) यांना अगदी लहान वयातच, म्हणजे समज येण्याच्या उंबरठ्यावरच कला म्हणजे काय आणि माणसाला कलात्मक निर्मितीची आवश्यकता काय याची स्पष्ट जाणीव झाली होती. कला आणि साहित्य हे मानवी आकलन कक्षा रुंदावण्याचे आणि सर्व सजीवांना एकत्र आणण्याचे सर्वोत्तम साधन असते; ही त्यांची आयुष्यभराची ठाम धारणा होती.

भूक















भूक सगळ्यात आधी मेंदू खाते 
त्याच्यानंतर डोळे 
त्यानंतर शरीरात उरलेल्या इतर गोष्टींना 
मागे काहीच सोडत नाही भूक
ती नात्यांना खाऊन टाकते 
आईचं असो बहिणीचं की मुलाचं

शहरात भूक













साध्यासाध्या गोष्टींही 
वडील खूप गूढ पद्धतीने सांगायचे 
"बेटा! या देशात लोक उपाशी मरतात 
आणि कवीही"
आम्ही हसायचो - ते नाराज व्हायचे

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...